कौटुंबिक अत्याचाराचा दिव्यांग महिलांवर होणारा परिणाम:विशेष संदर्भ वाशिम व यवतमाळ जिल्हा
Abstract
कौटुंबिक हिंसाचार ही समाजाला ग्रासणारी सर्वात मोठी व्याधी आहे.
सद्यकाळात सर्वात गंभीर समस्या कोणती आहे? ती म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. कौटुंबिक हिंसाचाराच्या मुख्य बळी स्त्रियाच ठरतात. स्त्री सुशिक्षित असो वा निरक्षर, ग्रामीण पार्श्वभूमीची असो वा शहरी—सर्वच स्तरांवर स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्यायाच्या व्यापक घटना आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय, दिव्यांग स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते.







